https://Goodlifehub.inA website by Madhav Bhope

Renuka Ashtak-14 नमस्ते श्रीअंबे विजयि परशूरामजननी- रेणुका अष्टक-14

devi image

Renuka Ashtak-14

विष्णूदास कवि (परमहंस परिव्राजकाचार्य पुरुषोत्तमानंद सरस्वती) हे इ. स. १८४४ ते १९१७ या कालावधीत होऊन गेलेले एक दत्तभक्त आणि रेणुका मातेचे निस्सीम भक्त होऊन गेलेले आहेत. आयुष्यातील खूप काळ त्यांनी माहूर येथे श्री रेणुकादेवीच्या भक्तीत व्यतीत केला आणि त्यांचे निर्वाण ही तेथेच झाले. त्यांनी रचलेल्या देवीच्या आरत्या, पदें आणि अष्टकें महाराष्ट्रातील विशेषतः देवीच्या भक्तांच्या घरा घरात प्रसिद्ध आहेत. विष्णूदास हे अत्यंत आर्तपणे आपल्या आईला- रेणुकामातेला साद घालतात- भेट देण्याविषयी कळकळीची विनंती करतात- कधी कधी, बालकाच्या अधिकाराने, रेणुका मातेवर रागावतात- या भव सागरात आपल्याला विषय रूपी शत्रूंशी झुंजायला एकट्यालाच पाठविले म्हणून तिला नांवे ही ठेवतात.  विष्णूदासांची अष्टकें अत्यंत भावपूर्ण आहेत. ज्यांच्या घरी देवीचे नवरात्र असतात, त्यांच्या घरी नवरात्रात दररोज रात्री घरात सर्व जणांनी एकत्र बसून ही  अष्टकें म्हणण्याची प्रथा आहे. अशी काही अष्टकें एका ठिकाणी मिळावी म्हणून या ब्लॉग च्या वाचकांसाठी यापूर्वी काही अष्टकें इथे उपलब्ध केली होती. त्या सगळ्यांची लिंक खाली दिलेली आहे. आता अजून काही अष्टकें या ठिकाणी देत आहोत.

 


विष्णूदासाची कविता 

Renuka Ashtak-14  

नमस्ते श्रीअंबे विजयि परशूरामजननी

( वृत्त : शिखरिणी )
नमस्ते श्रीअंबात्मज गणपती ब्रह्मकुमरी ।
नमस्ते श्रीविद्यावदन कमलानंद भ्रमरी ॥
नमस्ते श्रीदत्तात्रय गुरु कृपासागर मुनी ।
नमस्ते श्रीअंबे विजयि परशूरामजननी ॥१॥

भवान्धःकारान्ता, प्रगटलि महारत्न दिपिका ।
अयोनीसंभव्या, सकल गुणमंडीत लतिका ॥
स्वयं भंगा रंगा, सगुणरुप लावण्य अवनी ।
नमस्ते श्रीअंबे विजयि परशूरामजननी ॥२॥

निघाली यज्ञाच्या, सजिवन कला अग्निमधुनी ।
वसे सिंहाद्रींही, दशशतकरांलागिं वधुनी ॥
विराजे सदभक्तांकित भगवती याज्ञशयनी ।
नमस्ते श्रीअंबे विजयि परशूरामजननी ॥३॥

पिता रेणूराजा, रुचिक तपराशी श्वशुर तो ।
महा उग्र क्षोभी, रमण जमदग्नीच हरतो ॥
जिच्या जन्मांत्राच्या, त्रिभुवनिं सुता बंधुभगिनीं ।
नमस्ते श्रीअंबे विजयि परशूरामजननी ॥४॥

पतीतोद्धाराया, सुखकर भवाब्धींत नवका ।
जिच्या दैत्यानाशें, सुरवरगणालागिं तवका ॥
अई रेणूकाही, प्रबल महिषासूर मथनी ।
नमस्ते श्रीअंबे, विजयि परशूरामजननी ॥५॥

जणूं वत्सासाठीं, टपत विजनीं धेनु बसली ।
न येती कां कोणी, म्हणुनि मनिं कीं काय रुसली ॥
अपापें पान्हावें, मुळपिठ निरालंब अवनी ।
नमस्ते श्रीअंबे विजयि परशूरामजननी ॥६॥

गळा माळा पीतांबर भरजरी रंग पिंवळा ।
उरस्थ प्रेमाच्या, उदधिंत मनोभाव कवळा ॥
इच्या वाटे कोटी, हरपति रवीं चंद्र वदनीं ।
नमस्ते श्रीअंबे विजयि परशूरामजननी ॥७॥

कृपाब्धीची वाहे, क्षितितळवटीं वत्सलहरी ।
पतीतांची सारीं, दुरित मलपापें परिहरी ॥
करी विष्णूदासा, अळस त्यजुनी पावन जनीं ।
नमस्ते श्रीअंबे विजयि परशूरामजननी ॥८॥


************************************** 

 

या आधील पदांची लिंक खाली दिलेली आहे.

Renuka Ashtak-1 अगाई रेणुके ! किति दिन असे बोलुंच नये- रेणुका अष्टक-1

Renuka Ashtak-2 लाज याची रेणुके, तुला सारी- रेणुका अष्टक-2

Renuka Ashtak-3  तूं एक वेळ तरि दर्शन दे भवानी-रेणुका अष्टक-3

Renuka Ashtak-4 लक्ष कोटी चंद्रकिरण-रेणुका अष्टक-4

Renuka Ashtak-5 तू विचित्र गारुडीण- रेणुका अष्टक-5

Renuka Ashtak-6  तुझे सुंदर रूप रेणुके विराजे – रेणुका अष्टक-6

Renuka Ashtak-7  अवो रेणुके रेणुके रेणुके तू – रेणुका अष्टक-7

Renuka Ashtak-8  नको रेणुके ! आपुलें ब्रीद सोडूं- रेणुका अष्टक-8

Renuka Ashtak-9  ऊठ अंबे ! तूं झोंपि नको जाऊं- रेणुका अष्टक-9

Renuka Ashtak-10  तूं एक वेळ तरि दर्शन दे भवानी-अष्टक-10

Renuka Ashtak-11 तुला माझा अंबिके ! नमस्कार अष्टक-11

Renuka Ashtak-12 अतां रेणुके ! दुःख माझें निवारी- रेणुका अष्टक-12

Renuka Ashtak-13  म्हणूनि तुजला अलों, शरण मी आई रेणुके- रेणुका अष्टक-13

 

 

Renuka Ashtak-13 म्हणूनि तुजला अलों, शरण मी आई रेणुके- रेणुका अष्टक-13

devi image

Renuka Ashtak-13

विष्णूदास कवि (परमहंस परिव्राजकाचार्य पुरुषोत्तमानंद सरस्वती) हे इ. स. १८४४ ते १९१७ या कालावधीत होऊन गेलेले एक दत्तभक्त आणि रेणुका मातेचे निस्सीम भक्त होऊन गेलेले आहेत. आयुष्यातील खूप काळ त्यांनी माहूर येथे श्री रेणुकादेवीच्या भक्तीत व्यतीत केला आणि त्यांचे निर्वाण ही तेथेच झाले. त्यांनी रचलेल्या देवीच्या आरत्या, पदें आणि अष्टकें महाराष्ट्रातील विशेषतः देवीच्या भक्तांच्या घरा घरात प्रसिद्ध आहेत. विष्णूदास हे अत्यंत आर्तपणे आपल्या आईला- रेणुकामातेला साद घालतात- भेट देण्याविषयी कळकळीची विनंती करतात- कधी कधी, बालकाच्या अधिकाराने, रेणुका मातेवर रागावतात- या भव सागरात आपल्याला विषय रूपी शत्रूंशी झुंजायला एकट्यालाच पाठविले म्हणून तिला नांवे ही ठेवतात.  विष्णूदासांची अष्टकें अत्यंत भावपूर्ण आहेत. ज्यांच्या घरी देवीचे नवरात्र असतात, त्यांच्या घरी नवरात्रात दररोज रात्री घरात सर्व जणांनी एकत्र बसून ही  अष्टकें म्हणण्याची प्रथा आहे. अशी काही अष्टकें एका ठिकाणी मिळावी म्हणून या ब्लॉग च्या वाचकांसाठी यापूर्वी काही अष्टकें इथे उपलब्ध केली होती. त्या सगळ्यांची लिंक खाली दिलेली आहे. आता अजून काही अष्टकें या ठिकाणी देत आहोत.


विष्णूदासाची कविता 

Renuka Ashtak-13 

म्हणूनि तुजला अलों, शरण मी आई रेणुके

( वृत्त : पृथ्वी )
श्रीमंत गुणवंत तूं, सदय मंगलालंकृत ।
पसंतिस तुझ्या नये, स्तवन दूबळें प्राकृत ॥
निजस्तवनिं टेकिलीं, पर्दि सहस्त्रही मस्तकें ।
म्हणूनि तुजला अलों, शरण मी आई रेणुके ॥१॥


अशुद्ध स्तवनाक्षरें, म्हणुनि बोबडीं तोतरीं ।
तुला न रुचती जरी, समुळ हीं खुडीतों तरी ॥
मुकेंचि स्तन चाखितें, आरडतें भुकें बोलकें ।
म्हणूनि तुजला अलों, शरण मी आई रेणुके ॥२॥


जगीं न मिळली मला, सुशिल संगती वाटती ।
पुढें मज न चालवें, मनिं तुझी भिती वाटती ॥
परंतु तव चिंतनें, विविध जाळिं तूं पातकें ।
म्हणूनि तुजला अलों, शरण मी आई रेणुके ॥३॥


तुलाचि तुजसारखें, जननि नांव हें शोभलें ।
समान जगिं पाहसी, जड मुढादि ज्ञानी भले ॥
उदंड मज सारखें, पतित तारिले कौतुकें ।
म्हणूनि तुजला अलों, शरण मी आई रेणुके ॥४॥


न देचि निजगुप्त तें, धन पिता कुपुत्रा – करीं ।
जगांत अथवा जसा, निजगृहांत कुत्रा करी ॥
परंतु जननी अधीं, अधिक देत त्या भातुकें ।
म्हणूनि तुजला अलों, शरण मी आई रेणुके ॥५॥


सुपात्रहि न वंचना, करि गुरुहि दत्तात्रय ।
तशीच गृहदैवतें, विविध देति तापत्रय ॥
तुलाचि खळ पातकी, पटति अंध पंगू मुके ।
म्हणूनि तुजला अलों, शरण मी आई रेणुके ॥६॥


निराश्रित मि लेंकरुं, तरि नको उपेक्षा करुं ।
तुझ्या भुवनिं जिंकिती, हंसति कल्पवृक्षा करुं ॥
कृपामृत झरे सदा, स्त्रवति नित्य आराणुके ।
म्हणूनि तुजला अलों, शरण मी आई रेणुके ॥७॥


तुझीं विमल पावलें, परम सुकृतें पाहिलीं ।
अनंदसरिता जळीं, विषयवासना वाहिलीं ॥
विशेष मम मस्तकीं, अभयदान दे हस्तकें ।
म्हणूनि तुजला अलों, शरण मी आई रेणुके ॥८॥


सुकीर्ति तुझि चांगली, अवडली अम्हां गावया ।
अशा धरुन मी अलों, उचित दान मागावया ॥
प्रसादफळ दे असें, सतत विष्णुदासा निकें ।
म्हणूनि तुजला अलों, शरण मी आई रेणुके ॥९॥

 

 
 

************************************** 

या आधील पदांची लिंक खाली दिलेली आहे. 

Renuka Ashtak-1 अगाई रेणुके ! किति दिन असे बोलुंच नये- रेणुका अष्टक-1

Renuka Ashtak-2 लाज याची रेणुके, तुला सारी- रेणुका अष्टक-2

Renuka Ashtak-3  तूं एक वेळ तरि दर्शन दे भवानी-रेणुका अष्टक-3

Renuka Ashtak-4 लक्ष कोटी चंद्रकिरण-रेणुका अष्टक-4

Renuka Ashtak-5 तू विचित्र गारुडीण- रेणुका अष्टक-5

Renuka Ashtak-6  तुझे सुंदर रूप रेणुके विराजे – रेणुका अष्टक-6

Renuka Ashtak-7  अवो रेणुके रेणुके रेणुके तू – रेणुका अष्टक-7

Renuka Ashtak-8  नको रेणुके ! आपुलें ब्रीद सोडूं- रेणुका अष्टक-8

Renuka Ashtak-9  ऊठ अंबे ! तूं झोंपि नको जाऊं- रेणुका अष्टक-9

Renuka Ashtak-10  तूं एक वेळ तरि दर्शन दे भवानी-अष्टक-10

Renuka Ashtak-11 तुला माझा अंबिके ! नमस्कार अष्टक-11

Renuka Ashtak-12 अतां रेणुके ! दुःख माझें निवारी- रेणुका अष्टक-12

Renuka Ashtak-12 अतां रेणुके ! दुःख माझें निवारी- रेणुका अष्टक-12

devi image

Renuka Ashtak-12

विष्णूदास कवि (परमहंस परिव्राजकाचार्य पुरुषोत्तमानंद सरस्वती) हे इ. स. १८४४ ते १९१७ या कालावधीत होऊन गेलेले एक दत्तभक्त आणि रेणुका मातेचे निस्सीम भक्त होऊन गेलेले आहेत. आयुष्यातील खूप काळ त्यांनी माहूर येथे श्री रेणुकादेवीच्या भक्तीत व्यतीत केला आणि त्यांचे निर्वाण ही तेथेच झाले. त्यांनी रचलेल्या देवीच्या आरत्या, पदें आणि अष्टकें महाराष्ट्रातील विशेषतः देवीच्या भक्तांच्या घरा घरात प्रसिद्ध आहेत. विष्णूदास हे अत्यंत आर्तपणे आपल्या आईला- रेणुकामातेला साद घालतात- भेट देण्याविषयी कळकळीची विनंती करतात- कधी कधी, बालकाच्या अधिकाराने, रेणुका मातेवर रागावतात- या भव सागरात आपल्याला विषय रूपी शत्रूंशी झुंजायला एकट्यालाच पाठविले म्हणून तिला नांवे ही ठेवतात.  विष्णूदासांची अष्टकें अत्यंत भावपूर्ण आहेत. ज्यांच्या घरी देवीचे नवरात्र असतात, त्यांच्या घरी नवरात्रात दररोज रात्री घरात सर्व जणांनी एकत्र बसून ही  अष्टकें म्हणण्याची प्रथा आहे. अशी काही अष्टकें एका ठिकाणी मिळावी म्हणून या ब्लॉग च्या वाचकांसाठी यापूर्वी काही अष्टकें इथे उपलब्ध केली होती. त्या सगळ्यांची लिंक खाली दिलेली आहे. आता अजून काही अष्टकें या ठिकाणी देत आहोत.


विष्णूदासाची कविता 

Renuka Ashtak-12

 

वृत्त : ( भुजंगप्रयात )
नमो आदि गौरीसुता एकदंता ।
नमो शारदा सदगुरु ज्ञानदाता ॥
नमो आदिशक्ती महीषासुरारी ।
अतां रेणुके ! दुःख माझें निवारी ॥१॥


तुला चिंतिल्या पावती मोक्ष प्राणी ।
अशी गर्जना व्यासवाणी पुराणीं ॥
महाद्वाड हा एवढा पापि तारी ।
अतां रेणुके ! दुःख माझें निवारी ॥२॥


अगा जाहलीसी अनाथाचि आई ।
म्हणूनी तुला प्रार्थितों मी तुकाई ॥
करी कींव कीं गांजिलों संवसारीं ।
अतां रेणुके ! दुःख माझें निवारी ॥३॥


जगन्नायके ! आयके एक आतां ।
उणें काय होतें मला अल्प देतां ॥
बहु जन्मिचा मी तुझा ऊपकारी ।
अतां रेणुके ! दुःख माझें निवारी ॥४॥


अराधीत मी दास तूझा अराधी ।
करावी कृपा त्याहुनी आपराधी ॥
कृपा जोगवा दान मागे भिकारी ।
अतां रेणुके ! दुःख माझें निवारी ॥५॥


नको येउं कोपा कृपादृष्टिं पाहे ।
मला आसरा दूसरा कोण आहे ॥
तुला लाज माझी तुझी आस सारी ।
अतां रेणुके ! दुःख माझें निवारी ॥६॥


अझूनि कशी पाहसी नीरवाण ।
पहा माझिया दाटला कंठिं प्राण ॥
जिवा त्रासलों पावलों कष्ट भारी ।
अतां रेणुके ! दुःख माझें निवारी ॥७॥


श्रीदेवि जयदेवि जय जय भवानी ।
महादेवि तूं माय कैवल्यदानी ॥
स्तुती विष्णुदासाचिही आवधारी ।
अतां रेणुके ! दुःख माझें निवारी ॥८॥

 

************************************** 

Sant Tukaram abhang-8 संत तुकारामांचे अभंग-8

tukaram-3

संत तुकारामांचे अभंग या लेखमालेत दि . २३ जानेवारी पासून ९ फेब्रुवारी पर्यंत संत तुकारामांच्या अभंगां ची माहिती ६ लेखांमधून घेतली. त्यानंतर ७ वा लेख दि. २४ मार्च रोजी लिहिला. मधल्या दीड महिन्याच्या खंडानंतर, पुन्हा दीड महिन्याचा खंड पडला. असो.  पण इतक्या छान विषयावर जमेल तसे लिहीत जावे असा प्रयत्न आहे.

Sant Tukaram abhang-8  

संत तुकारामांचे अभंग-8 

संत तुकारामांचे अभंग आपण गेल्या ६ लेखांमधून पाहत आहोत. मागील लेखात काही करुणापर अभंग आणि काही स्फुट अभंग आपण पाहिले. मी यू ट्यूब वर पू. डॉ. सुषमाताई वाटवे यांची प्रवचने ऐकत होतो. त्यात त्यांनी एक गोष्ट फार महत्त्वाची सांगितली आहे. त्या म्हणतात की भक्तिला ज्ञानाची जोड पाहिजे. आणि ज्ञानाला भक्तीची जोड पाहिजे. ईश्वर हा सर्वशक्तिमान आहे, सर्वव्यापी आहे, आनंदरूप आहे.. आणि आपणही ईश्वराचेच स्वरूप आहोत किंवा अंश आहोत. पण नुसते हे ज्ञान होऊन काय कामाचे? आपल्याला याची प्रचिती- प्रत्यक्ष अनुभव येण्यासाठी, त्या ईश्वराकडेच करुणा भाकावी लागेल.

मनुष्य जसा जसा अध्यात्माकडे वळतो, तसे तसे त्याला आपल्यातले अवगुण प्रकर्षाने जाणवायला लागतात. तो पर्यंत कुठल्याही माणसाला आपल्यात काही अवगुण आहेत याची साधी शंका सुद्धा येत नाही. उलट आपल्यातल्या अवगुणांनाच आपले वैशिष्ट्य आणि आपले गुण समजून आपण तोऱ्यात असतो. पण जेंव्हा मनुष्य अध्यात्माकडे वळतो, तेंव्हा त्याची अवस्था कशी होते, ते खालील अभंगात तुकाराम महाराज वर्णन करतात-

माझे मज कळों येती अवगुण काय करूं मन अनावर

आतां आड उभा राहें नारायणा दयासिंधुपणा साच करीं

आणि जेंव्हा हे अवगुण लक्षात येतात- आणि आपल्याच्याने ते आटोक्यात येत नाहीत, त्यावेळी त्या दयासिंधू कडे करुणा भाकल्यावाचून पर्याय राहत नाही- “आता आड उभा राहे नारायणा.”

तुकाराम महाराजांच्या एका अभंगाने मला खूप मदत केली आहे.

जेथे जातो तेथे तू माझा सांगाती चालविसी हाती धरूनिया ।।

चालो वाटे आम्ही तुझाचि आधार चालीविसी भार सवे माझा ।।

बोलो जाता बरळ करिसी ते नीट नेली लाज धीट केली देवा ।।

अवघे जन मज झाले लोकपाळ सोइरे सकळ प्राणसखे ।।

तुका म्हणे आता खेळतो कौतुके झाले तुझे सुख अंतर्बाही ।।

 

आयुष्यात अनेक कठीण प्रसंग आले. त्या प्रत्येक प्रसंगाला तोंड देण्याचे बळ आपल्याकडे असतेच असे नाही. कित्येक वेळा काय बोलावे हे आपल्याला समजत नाही. आपण बोलण्यात तितके हुशार किंवा हजरजबाबी नसतो. पण अशा वेळी, बोलो जाता बरळ करिसी ते नीट नेली लाज धीट केली देवा ।। आपण जे काही बरळतो, त्याला तो नीट करून घेतो. आपल्या प्रत्येक हालचालीत, तो आपल्याला अगदी लहान मुलाला जशी त्याची माऊली हाताला धरून चालविते, तसे चालवितो. लहान मूल जसे जेंव्हा त्याला आईचा आधार असतो, तेंव्हा कशालाही घाबरत नाही, त्याप्रमाणे चालो वाटे आम्ही तुझाचि आधार चालीविसी भार सवे माझा ।।

आणि जेंव्हा असा आईचा आधार असतो, तेंव्हा कोणी आपले शत्रू वाटतच नाहीत- जसे लहान मुलाला शत्रू- मित्र अशी काही भावना नसते- त्याप्रमाणे देवाचा आधार घेतल्यानंतर- अवघे जन मज झाले लोकपाळ सोइरे सकळ प्राणसखे. अवघे जन हे सोयरे- सखे वाटू लागतात.

आणि मग संसारातील अडचणी या अडचणी वाटतच नाहीत- सगळा खेळ वाटू लागतो- तुका म्हणे आता खेळतो कौतुके झाले तुझे सुख अंतर्बाही ।।

हा अभंग खरेच त्या पातळीवर जाऊन अनुभवायचाच विषय आहे- जेंव्हा तो अनुभव येतो- तेंव्हा अंगावर सर्रकन काटा येतो.

जोपर्यंत विठू माऊलीची भेट होत नाही, तोपर्यंत साधकाची अवस्था कशी होते हे खालील अभंगातून वर्णन केले आहे-

पडियेलों वनीं थोर चिंतवनीं । उशीर कां आझूनि लावियेला

येई गा विठ्ठला येई गा विठ्ठला । प्राण हा फुटला आळवितां

काय तुज नाहीं लौकिकाची शंका । आपुल्या बाळका मोकलितां

तुका म्हणे बहु खंती वाटे जीवा । धरियेलें देवा दुरी दिसे

आपल्या स्वभावातील अवगुण जसे जसे दिसू लागतात तसे तसे संत म्हणतात- “भागलो मी आता माझिया स्वभावे”

भागलों मी आतां आपुल्या स्वभावें कृपा करोनि देवें आश्‍वासीजे

देउनि आलिंगन प्रीतीच्या पडिभरें अंगें हीं दातारें निववावीं

अमृताची दृष्टी घाळूनियां वरी शीतळ हा करीं जीव माझा

घेई उचलूनि पुसें तहानभूक पुसीं माझें मुख पीतांबरें

बुझावोनि माझी धरीं हनुवटी ओवाळुनी दिठी करुनी सांडीं

तुका म्हणे बापा अहो विश्‍वंभरा आतां कृपा करा ऐसी कांहीं

 

खालील एक अभंगही माझ्या खूप आवडीचा आहे. जेंव्हा कोणी तत्त्वज्ञानाचा खूप कीस पाडू लागते, तेंव्हा म्हणावेसे वाटते-

मज नाहीं तुझ्या ज्ञानाची ते चाड घेतां वाटे गोड नाम तुझें

नेणतें लेकरू आवडीचे तान्हे बोलतों वचनें आवडीनें

भक्ति नेणें कांहीं वैराग्य तें नाहीं घातला विठाई भार तुज

तुका म्हणे नाचें निर्लज्ज होऊनि नाहीं माझे मनीं दुजा भाव

 

खरंच देवावर सर्व भार घालून राहणे- ही काही छोटी गोष्ट नाही. आयुष्यात क्षणोक्षणी आणि घडी घडीला येणाऱ्या कठीण प्रसंगांना सामोरे जायचे असेल तर याच्या सारखा दुसरा उपाय नाही. आजकालच्या मॉडर्न सायन्सप्रमाणे सुद्धा relaxed राहणे हा सर्व प्रकारच्या टेन्शन वर उत्तम उपाय आहे.

अशा प्रकारे अनेक करुणापर अभंग तुकाराम महाराजांचे आहेत.

आयुष्यात आपल्याला बऱ्याच वेळा काही गोष्टी, काही शल्यें असतात, तो मनात राहतात, आणि ती आपण कोणापाशीही शेअर करू शकत नाही. जसे लहान मूल आपल्या आई पाशी सगळ्या गोष्टी शेअर करते, तसे मोठेपणी-

जाऊं देवाचिया गांवां देव देईल विसांवा

देवा सांगों सुखदुःख देव निवारील भूक

घालूं देवासीच भार देव सुखाचा सागर

राहों जवळी देवापाशीं आतां जडोनि पायांसीं

तुका म्हणे आम्ही बाळें या देवाचीं लडिवाळें

वरील अभंग हा उषा मंगेशकर यांनी आपल्या आवाजात अगदी आर्तपणे गायला आहे. तो अभंग आपण आठवणीतील गाणी या वेबसाइट वर  खालील लिंकवर ऐकू शकतो. 

https://www.aathavanitli-gani.com/Song/Jau_Devachiya_Gava

तुकाराम महाराजांच्या अभंगांबद्दल लिहितांना कोणताही अभंग सोडावासा वाटत नाही, इतके सर्व अभंग छान आहेत. आपण येत्या काही लेखांमधून आणखी काही अभंगांचा आस्वाद घेणार आहोत.

 आपणांस ही लेखमाला आवडत असल्यास कॉमेंट करून कळविणे. आणि लाईक करणे.

माधव भोपे

संत तुकारामांचे अभंग-7 Sant Tukaram abhang-7

tukaram-3

संत तुकारामांचे अभंग-7 Sant Tukaram abhang-7

या आधी आपण ७ जानेवारी पासून ते २१ जानेवारी पर्यंत संत नामदेवांच्या अभंगांची माहिती १० लेखांमधून घेतली,  त्यानंतर दि. २३ जानेवारी पासून ९ फेब्रुवारी पर्यंत संत तुकारामांच्या अभंगां ची माहिती ६ लेखांमधून घेतली. 

मध्यंतरी काही दिवस या उपक्रमात खंड पडला. माझा दूसरा ब्लॉग goodworld.in यावरही या काळात A glimpse of Vedas या नांवाने काही माहिती लिहिली आहे. त्यातही या काळात खंड पडला. 

पण आता वरील विषयांवरचे लिखाण पुन्हा सुरू करीत आहे. संत तुकारामांच्या अभंगांबद्दल चर्चा करणाऱ्या लेखमालिकेतील हा ७ वा लेख असेल. यात अर्थात, संतांचे अभंग जशास तसे दिले आहेत, पण त्यांच्याविषयी आपल्याला वाटणाऱ्या भावना थोडक्यात मांडण्याचा प्रयत्न केला आहे. हा प्रयत्न अगदीच तोकडा आहे, पण कोणत्याही निमित्ताने का होईना, संतांची आणि ईश्वराची आठवण होणे हे महत्त्वाचे. या विषयात रस असणाऱ्या भाविकांना हा प्रयत्न आवडेल असे वाटते. 

Sant Tukaram abhang-7 

संत तुकारामांचे अभंग-7 

संत तुकारामांचे अभंग आपण गेल्या ६ लेखांमधून पाहत आहोत. मागील लेखात काही करुणापर अभंग आणि काही स्फुट अभंग आपण पाहिले. मी यू ट्यूब वर पू. डॉ. सुषमाताई वाटवे यांची प्रवचने ऐकत होतो. त्यात त्यांनी एक गोष्ट फार महत्त्वाची सांगितली आहे. त्या म्हणतात की भक्तिला ज्ञानाची जोड पाहिजे. आणि ज्ञानाला भक्तीची जोड पाहिजे. ईश्वर हा सर्वशक्तिमान आहे, सर्वव्यापी आहे, आनंदरूप आहे.. आणि आपणही ईश्वराचेच स्वरूप आहोत किंवा अंश आहोत. पण नुसते हे ज्ञान होऊन काय कामाचे? आपल्याला याची प्रचिती- प्रत्यक्ष अनुभव येण्यासाठी, त्या ईश्वराकडेच करुणा भाकावी लागेल.

मनुष्य जसा जसा अध्यात्माकडे वळतो, तसे तसे त्याला आपल्यातले अवगुण प्रकर्षाने जाणवायला लागतात. तो पर्यंत कुठल्याही माणसाला आपल्यात काही अवगुण आहेत याची साधी शंका सुद्धा येत नाही. उलट आपल्यातल्या अवगुणांनाच आपले वैशिष्ट्य आणि आपले गुण समजून आपण तोऱ्यात असतो. पण जेंव्हा मनुष्य अध्यात्माकडे वळतो, तेंव्हा त्याची अवस्था कशी होते, ते खालील अभंगात तुकाराम महाराज वर्णन करतात-

माझे मज कळों येती अवगुण काय करूं मन अनावर

आतां आड उभा राहें नारायणा दयासिंधुपणा साच करीं

आणि जेंव्हा हे अवगुण लक्षात येतात- आणि आपल्याच्याने ते आटोक्यात येत नाहीत, त्यावेळी त्या दयासिंधू कडे करुणा भाकल्यावाचून पर्याय राहत नाही- “आता आड उभा राहे नारायणा.”

तुकाराम महाराजांच्या एका अभंगाने मला खूप मदत केली आहे.

जेथे जातो तेथे तू माझा सांगाती चालविसी हाती धरूनिया ।।

चालो वाटे आम्ही तुझाचि आधार चालीविसी भार सवे माझा ।।

बोलो जाता बरळ करिसी ते नीट नेली लाज धीट केली देवा ।।

अवघे जन मज झाले लोकपाळ सोइरे सकळ प्राणसखे ।।

तुका म्हणे आता खेळतो कौतुके झाले तुझे सुख अंतर्बाही ।।

 

आयुष्यात अनेक कठीण प्रसंग आले. त्या प्रत्येक प्रसंगाला तोंड देण्याचे बळ आपल्याकडे असतेच असे नाही. कित्येक वेळा काय बोलावे हे आपल्याला समजत नाही. आपण बोलण्यात तितके हुशार किंवा हजरजबाबी नसतो. पण अशा वेळी, बोलो जाता बरळ करिसी ते नीट नेली लाज धीट केली देवा ।। आपण जे काही बरळतो, त्याला तो नीट करून घेतो. आपल्या प्रत्येक हालचालीत, तो आपल्याला अगदी लहान मुलाला जशी त्याची माऊली हाताला धरून चालविते, तसे चालवितो. लहान मूल जसे जेंव्हा त्याला आईचा आधार असतो, तेंव्हा कशालाही घाबरत नाही, त्याप्रमाणे चालो वाटे आम्ही तुझाचि आधार चालीविसी भार सवे माझा ।।

आणि जेंव्हा असा आईचा आधार असतो, तेंव्हा कोणी आपले शत्रू वाटतच नाहीत- जसे लहान मुलाला शत्रू- मित्र अशी काही भावना नसते- त्याप्रमाणे देवाचा आधार घेतल्यानंतर- अवघे जन मज झाले लोकपाळ सोइरे सकळ प्राणसखे. अवघे जन हे सोयरे- सखे वाटू लागतात.

आणि मग संसारातील अडचणी या अडचणी वाटतच नाहीत- सगळा खेळ वाटू लागतो- तुका म्हणे आता खेळतो कौतुके झाले तुझे सुख अंतर्बाही ।।

हा अभंग खरेच त्या पातळीवर जाऊन अनुभवायचाच विषय आहे- जेंव्हा तो अनुभव येतो- तेंव्हा अंगावर सर्रकन काटा येतो.

जोपर्यंत विठू माऊलीची भेट होत नाही, तोपर्यंत साधकाची अवस्था कशी होते हे खालील अभंगातून वर्णन केले आहे-

पडियेलों वनीं थोर चिंतवनीं । उशीर कां आझूनि लावियेला

येई गा विठ्ठला येई गा विठ्ठला । प्राण हा फुटला आळवितां

काय तुज नाहीं लौकिकाची शंका । आपुल्या बाळका मोकलितां

तुका म्हणे बहु खंती वाटे जीवा । धरियेलें देवा दुरी दिसे

आपल्या स्वभावातील अवगुण जसे जसे दिसू लागतात तसे तसे संत म्हणतात- “भागलो मी आता माझिया स्वभावे”

भागलों मी आतां आपुल्या स्वभावें कृपा करोनि देवें आश्‍वासीजे

देउनि आलिंगन प्रीतीच्या पडिभरें अंगें हीं दातारें निववावीं

अमृताची दृष्टी घाळूनियां वरी शीतळ हा करीं जीव माझा

घेई उचलूनि पुसें तहानभूक पुसीं माझें मुख पीतांबरें

बुझावोनि माझी धरीं हनुवटी ओवाळुनी दिठी करुनी सांडीं

तुका म्हणे बापा अहो विश्‍वंभरा आतां कृपा करा ऐसी कांहीं

 

खालील एक अभंगही माझ्या खूप आवडीचा आहे. जेंव्हा कोणी तत्त्वज्ञानाचा खूप कीस पाडू लागते, तेंव्हा म्हणावेसे वाटते-

मज नाहीं तुझ्या ज्ञानाची ते चाड घेतां वाटे गोड नाम तुझें

नेणतें लेकरू आवडीचे तान्हे बोलतों वचनें आवडीनें

भक्ति नेणें कांहीं वैराग्य तें नाहीं घातला विठाई भार तुज

तुका म्हणे नाचें निर्लज्ज होऊनि नाहीं माझे मनीं दुजा भाव

 

खरंच देवावर सर्व भार घालून राहणे- ही काही छोटी गोष्ट नाही. आयुष्यात क्षणोक्षणी आणि घडी घडीला येणाऱ्या कठीण प्रसंगांना सामोरे जायचे असेल तर याच्या सारखा दुसरा उपाय नाही. आजकालच्या मॉडर्न सायन्सप्रमाणे सुद्धा relaxed राहणे हा सर्व प्रकारच्या टेन्शन वर उत्तम उपाय आहे.

अशा प्रकारे अनेक करुणापर अभंग तुकाराम महाराजांचे आहेत.

आयुष्यात आपल्याला बऱ्याच वेळा काही गोष्टी, काही शल्यें असतात, तो मनात राहतात, आणि ती आपण कोणापाशीही शेअर करू शकत नाही. जसे लहान मूल आपल्या आई पाशी सगळ्या गोष्टी शेअर करते, तसे मोठेपणी-

जाऊं देवाचिया गांवां देव देईल विसांवा

देवा सांगों सुखदुःख देव निवारील भूक

घालूं देवासीच भार देव सुखाचा सागर

राहों जवळी देवापाशीं आतां जडोनि पायांसीं

तुका म्हणे आम्ही बाळें या देवाचीं लडिवाळें

वरील अभंग हा उषा मंगेशकर यांनी आपल्या आवाजात अगदी आर्तपणे गायला आहे. तो अभंग आपण आठवणीतील गाणी या वेबसाइट वर  खालील लिंकवर ऐकू शकतो. 

https://www.aathavanitli-gani.com/Song/Jau_Devachiya_Gava

तुकाराम महाराजांच्या अभंगांबद्दल लिहितांना कोणताही अभंग सोडावासा वाटत नाही, इतके सर्व अभंग छान आहेत. आपण येत्या काही लेखांमधून आणखी काही अभंगांचा आस्वाद घेणार आहोत.

 आपणांस ही लेखमाला आवडत असल्यास कॉमेंट करून कळविणे. आणि लाईक करणे.

माधव भोपे

Renuka Ashtak-11 तुला माझा अंबिके ! नमस्कार- रेणुका अष्टक-11

devi image

विष्णूदास कवि (परमहंस परिव्राजकाचार्य पुरुषोत्तमानंद सरस्वती) हे इ. स. १८४४ ते १९१७ या कालावधीत होऊन गेलेले एक दत्तभक्त आणि रेणुका मातेचे निस्सीम भक्त होऊन गेलेले आहेत. आयुष्यातील खूप काळ त्यांनी माहूर येथे श्री रेणुकादेवीच्या भक्तीत व्यतीत केला आणि त्यांचे निर्वाण ही तेथेच झाले. त्यांनी रचलेल्या देवीच्या आरत्या, पदें आणि अष्टकें महाराष्ट्रातील विशेषतः देवीच्या भक्तांच्या घरा घरात प्रसिद्ध आहेत. विष्णूदास हे अत्यंत आर्तपणे आपल्या आईला- रेणुकामातेला साद घालतात- भेट देण्याविषयी कळकळीची विनंती करतात- कधी कधी, बालकाच्या अधिकाराने, रेणुका मातेवर रागावतात- या भव सागरात आपल्याला विषय रूपी शत्रूंशी झुंजायला एकट्यालाच पाठविले म्हणून तिला नांवे ही ठेवतात.  विष्णूदासांची अष्टकें अत्यंत भावपूर्ण आहेत. ज्यांच्या घरी देवीचे नवरात्र असतात, त्यांच्या घरी नवरात्रात दररोज रात्री घरात सर्व जणांनी एकत्र बसून ही  अष्टकें म्हणण्याची प्रथा आहे. अशी काही अष्टकें एका ठिकाणी मिळावी म्हणून या ब्लॉग च्या वाचकांसाठी यापूर्वी काही अष्टकें इथे उपलब्ध केली होती. त्या सगळ्यांची लिंक खाली दिलेली आहे. आता अजून काही अष्टकें या ठिकाणी देत आहोत.


विष्णूदासाची कविता 

१६ कडव्यांचे दीर्घ अष्टक 

Renuka Ashtak-11 

तुला माझा अंबिके ! नमस्कार

( वृत्त : दिंडी )
तुझें सुंदर रुप रेणुके विराजे
वर्णिताती मुनि देव देवि राजे
कोण स्वगुणाचा करिल गुणाकार
तुला माझा अंबिके ! नमस्कार ॥१॥

सदानंद मुख चंद्रमा सबंध
रत्नहार, मणी, वांकि बाजुबंद
मुक्तजडित सुवर्ण अलंकार
तुला माझा अंबिके ! नमस्कार ॥२॥

विलोकुन नथ नासिकीं, काप कानीं
मार्ग विसरावा मोक्ष साधकांनीं
हांक द्यावी लक्षुनी लक्षवार
तुला माझा अंबिके ! नमस्कार ॥३॥

साडि पिवळी खडिदार भरजरीची
तंग चोळी अंगांत अंजिरीची
टिळा कुंकुम, निट वेणि पिळेदार
तुला माझा अंबिके ! नमस्कार ॥४॥

सप्तशतिचे पुढें पाठ घणघणाट
टाळ, घंटा, कंकणें, खणखणाट
पायिं पैंजण घन देति झणत्कार
तुला माझा अंबिके ! नमस्कार ॥५॥

मूळ धाडी दर्शना यावयासी
लावि भजनीं या उर्वरित वयासी
तोडि सारा हा दृष्ट अहंकार
तुला माझा अंबिके ! नमस्कार ॥६॥

पर्वतीं या बसलीस अम्हांसाठीं
परी अमुची खरचली जमा साठी
भरत आला स्थळ – भरतिचा अकार
तुला माझा अंबिके ! नमस्कार ॥७॥

माय वंची दुरदेशिं मुलांनाही
अशी वार्ता ठाऊक मला नाहीं
अगे आई ! हा काय चमत्कार
तुला माझा अंबिके ! नमस्कार ॥८॥

ब्रीद सोडुन बसलीस बेफिकीर
मला केलें सरदार ना फकीर
काय म्हणतिल व्यासादि ग्रंथकार
तुला माझा अंबिके ! नमस्कार ॥९॥

तरी आतां ये, धांव, पाव, तार
त्वरित आतां तरि धांव, पाव, तार
करी माझा अविलंबें अंगिकार
तुला माझा अंबिके ! नमस्कार ॥१०॥

काय रागें झालीस पाठमोरी
तेरि अम्मा फिर एकि वाट मोरी
केशराचा हरपेल कीं शकार
तुला माझा अंबिके ! नमस्कार ॥११॥

पहा जातो नरजन्म – रंग वायां
नये सहसा परतून रंगवाया
म्हणुनि करितों विशेष हाहाःकार
तुला माझा अंबिके ! नमस्कार ॥१२॥

कृपासूत्रें वोढोनि पाय दावी
जशी बांधी कृष्णासि माय दावीं
अहो मीही अन्यायि अनीवार
तुला माझा अंबिके ! नमस्कार ॥१३॥

मीच अथवा तुज ह्रदय – मंदिरांत
प्रेमसूत्रें बांधीन दिवस – रात
यथातथ्य परि नसे अधीकार
तुला माझा अंबिके ! नमस्कार ॥१४॥

कसा एका पुष्पाचिया आवडीनें
मुक्त केला गजराज तांतडीनें
तसा मीही अर्पितों सुमनहार
तुला माझा अंबिके ! नमस्कार ॥१५॥

केली दुल्लड ही पदर पंधराची
तुझ्यासाठींची, आण शंकराची
विष्णुदास म्हणे रेणुके स्विकार
तुला माझा अंबिके ! नमस्कार ॥१६॥

**************************************