https://Goodlifehub.inA website by Madhav Bhope

मनाच्या तळाशी.. To the bottom of Mind

Random thoughts…

These are some random thoughts.. not necessarily arranged in an orderly manner-i.e. a purpose- a beginning..the content.. and a summary… 

Some of these thoughts are based on some books I read, some speeches I heard, and some of them just ‘occurred’ to me…  It’s a mixed bag… 

May be, in future, these musings will take a more orderly shape… till that time..  read on….

 

 

कधी कधी आपल्याला एखादे उच्च ध्येय गाठायचे असते.. पण त्यासाठी लागणारा दृढ निश्चय, स्पष्टता आणि निर्भयता नसते.. आपल्याकडे हे गुण नसल्यामुळे, जीवनात वारंवार अपयशाचा सामना करावा लागतो.

आपल्या मनात असंख्य प्रकारच्या भीती आणि काळज्या असतात. “असे झाले तर?..” “तसे झाले तर?..” आणि पूर्ण आयुष्यभर आपण या अनामिक भीतींच्या ओझ्याखाली दबून सगळी कामें एखाद्या गुलामासारखी करीत राहतो. कुठल्याच कामाचा मनापासून आनंद घेऊ शकत नाही.

 

त्या भीती तशाच राहतात, कारण आपण कधीच त्या खऱ्या आहेत का, त्यांची किती शक्यता आहे, इत्यादि गोष्टींची छाननी करीत नाहीत. आपण त्यांना भिडतच नाही. आणि आपण या गोष्टी कधीच.. कधीच.. कुणा बरोबरही शेअर करत नाहीत.. अगदी आपल्या ‘जवळच्या’ माणसांसोबत, जवळच्या नात्यात.. अगदी आपले आई वडील, भाऊ बहीण.. शिक्षक, जवळचा मित्र.. कुणाही बरोबर शेअर करत नाहीत. अर्थात त्या शेअर न करण्यामागे तसेच काही कारण असू शकते, किंवा आपला त्या व्यक्तिबद्दलचा अविश्वास.. आपली खिल्ली उडवली जाण्याची, आपण मूर्ख ठरवले जाण्याची भीती, आपली कमजोर स्थानें उघडी पडण्याची भीती… आपल्या बद्दल गैरसमज होण्याची भीती..

ही कारणें ही तितकीच काल्पनिक असू शकतात, जितकी की आपली भीती.. आपला अहंकार आपल्याला या गोष्टींची चर्चा करू देत नाही, आणि त्या एखाद्या बाहेरून झाकलेल्या जखमेसाख्या, आतल्या आत चिघळत जातात..

 

अशा प्रकारच्या भीती सर्वांनाच असतात.. पण केंव्हा ना केंव्हा यांचे परीक्षण केले गेलेच पाहिजे.. त्यांचा सामना केला गेलाच पाहिजे. तरच आपण मरेपर्यंत निर्भय होऊन जगू शकू. निर्भय होऊन जगणे हेच खरे जगणे आहे. हे शक्य आहे का? तर शक्य आहे. हे तेंव्हा शक्य आहे, जेंव्हा आपण  ‘बाह्य’ जगतात वागण्याचे ‘नियम’ किंवा ‘पद्धत’ समजून घेऊ आणि आपल्या ‘आत’ काय चालले आहे ते समजून घेऊ शकू.

एक गोष्ट समजून घेण्याची आहे, की एखादी घटना ‘बाह्य’ जगात घडण्याआधी आपल्या ‘आतल्या’ जगात फार पूर्वी घडलेली असते..

 

आपल्या मनाला क्षणाक्षणाला बदलणाऱ्या बाह्य जगतासोबत चिकटून राहण्याची एवढी सवय झालेली असते, की आपल्या आत.. अगदी आत असलेले स्वतःचे ‘निखळ अस्तित्व’.. त्याला जाणवतच नाही.. आपले ‘निखळ अस्तित्व’, जे की सगळ्या दुःख, चिंता, काळज्या यांच्या पलिकडे आहे.. कालातीत आहे.. शुद्ध आनंद स्वरूप आहे.. पण ते जाणवण्यासाठी आधी मनाचा गढूळपणा कमी होणे गरजेचे असते..

 

मनाचा गढूळपणा कमी होण्यासाठी मात्र नित्य सराव, चिकाटी आणि योग्य मार्गदर्शन यांची गरज आहे..

हा विषय निघाला, की “काय करावे, आम्हाला योग्य मार्गदर्शनच नाही मिळत. आजकालच्या जगात ‘खरे गुरु’ मिळणेच अवघड झाले आहे..” इत्यादि गोष्टी लगेच ऐकायला मिळतात. पण वरील तीन गोष्टींपैकी पहिल्या दोन आधी व्हाव्या लागतात हे लक्षात घेणे आवश्यक आहे.

 

 

 

 

माधव भोपे 


Discover more from GoodLifeHub.in

Subscribe to get the latest posts sent to your email.

Post your comments here

Discover more from GoodLifeHub.in

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading