https://Goodlifehub.inA website by Madhav Bhope

Hotels in America-अमेरिकेतील हॉटेल्स

thai hotel

Small Hotels in America अमेरिकेतील छोटी हॉटेल्स

अमेरिकेतील हॉटेल्स चे अनुभव

नायगारा पाहून परत येत असतांना, बफेलो येथून, क्लीव्हलँडला कारने परत येत असतांना, वाटेत कुठे ब्रेकफास्ट मिळेल का म्हणून मोबाईल वर शोध घेत होतो.

अमेरिकन फूड मधील आम्हाला काहीच चालण्यासारखे नसायचे, कारण बहुतेक सर्व पदार्थांमध्ये कुठल्या ना कुठल्या स्वरुपात नॉन व्हेज असतेच. भारतीय जेवणाशी त्यातल्या त्यात मॅच होणारे दोन प्रकार म्हणजे दोन प्रकार: एक तर मेक्सिकन आणि दुसरे म्हणजे थाई.

आम्हाला मोबाईलवर वाटेतील एका छोट्याशा व्हिलेज मध्ये एक थाई रेस्टॉरंट असल्याचा शोध लागला. गूगल मॅप च्या ‍‌सहाय्याने रस्ता शोधत शोधत आम्ही त्या बऱ्याच आतल्या बाजूला असलेल्या छोट्याशा खेडेगावात गेलो.  अत्यंत शांत व छोटेसे खेडे होते ते. रस्त्यावर एकही माणूस दिसत नव्हता- नेहमीप्रमाणे. खेडे असल्यामुळे वाहनेही अगदी अभावानेच होती. मॅपवरून पत्ता काढून आम्ही त्या थाई रेस्टॉरंटमध्ये गेलो. बहुतेक त्यांचे रहाते घरच छोट्याश्या रेस्टॉरंटमध्ये परिवर्तित केले होते, व २-३ थाई स्त्रियाच ते रेस्टॉरंट चालवीत होत्या. अत्यंत टुमदार, रेखीव व कलात्मक सजावट असलेली जागा. आतमध्ये कमालीची शांतता आणि स्वच्छता. खेडेगाव म्हणून कसलाही गचाळ पणा चालेल अशी मानसिकता नाही. सर्व गोल टेबल्सवर स्वच्छ टेबल क्लॉथ्स, त्यावर स्वच्छ काचेचे ग्लास. परीट घडीचे पांढरे शुभ्र रुमाल टोकदार घडी घालून त्या ग्लास मध्ये ठेवलेले.thai hotel

आम्ही तिथे जाऊन बसल्यावर मध्यमवयीन थाई स्त्रीने  (जी की बहुतेक तेथील मालकीण असावी), तत्परतेने व हसतमुखाने, आमच्या हातात मेन्यू कार्ड दिले. इथे सगळ्याच हॉटेल्स मध्ये तुम्हाला मेन्यू कार्ड लगेच देतात. त्यासाठी, तुम्हाला ‘शुक, शुक’ म्हणून कोणाचे लक्ष वेधून घ्यायचा प्रयत्न करावा लागत नाही, की ओरडावे लागत नाही. तसेच तुम्ही ऑर्डर देईपर्यंत तुमच्या छातीवर उभे रहात नाहीत, की, अर्धवट ऑर्डर घेऊन घाई घाईने पळून जात नाहीत. तुम्हाला मेन्यू कार्ड दिल्यानंतर, ते वाचून तुमचा मेन्यू ठरवायला पुरेसा वेळ देतात व तुमचे ठरले आहे असे दिसताच, तुमची ऑर्डर घ्यायला पुढ्यात येतात. तसेच तुमची जी स्पेशल requirement असेल ती काळजीपूर्वक नोट करतात उदा..Less spicy, no onion, no meat, no eggs, इत्यादि. व त्याबरहुकूम पदार्थ बनवतात.thai woman

तर अशा प्रकारे आमची ऑर्डर घेऊन त्या स्त्रिया गेल्या, आणि १५ मिनिटात, अत्यंत स्वादिष्ट व गरम गरम असे जेवण आमच्या पुढ्यात आले. त्या शांत खेड्यात, इतक्या छान वातावरणात खाल्लेले जेवण हे आमच्या चांगलेच लक्षात राहिले.thai food

आम्ही नायगरा हून परत आलो, तेंव्हा, रात्रीचे १० वाजून गेले होते, बराच उशीर झाल्यामुळे, व विमान तळावरून घरी पोहोचायला अजून एक तास लागणार असल्यामुळे, आम्ही, बाहेरच जेवायचे ठरवले. परंतु हॉटेल्सही बंद होण्याची वेळ झाली होती. बहुतेक सर्व हॉटेल्स रात्री १० किंवा जास्तीत जास्त १०.३० पर्यंत बंद होतात. मग सचिन गाडी चालवीत असतांना, मी वेब वर, उशिरापर्यंत उघडी असणारी हॉटेल्स शोधू लागलो. अशी फारच थोडी हॉटेल्स होती. त्यातले, भारतीय जेवण देणारे एक हॉटेल नशिबाने सापडले, जे की ११.३० पर्यंन्त उघडे होते. आम्ही तिथे फोन करून खात्री करून घेतली आणि मॅप वरून शोधत शोधत रात्री ११ च्या सुमारास त्या हॉटेल मध्ये पोहोंचलो. ते हॉटेल बहुतेक कुणीतरी भारतीय बिझनेसमननेच सुरु केले असावे. हॉटेल अजून प्राथमिक अवस्थेतच होते, म्हणजे डेकोरेशन वगैरे विशेष काही नव्हते. पण तिथे बरेच भारतीय ग्रुप्स जेवण करीत असतांना दिसत होते. आम्ही गेल्याबरोबर, वेटर च्या स्वरुपात, ३-४ भारतीय मुलींचा जथा आम्हाला समोर आला, व आम्हाला रिकाम्या असलेल्या टेबल वर बसवले. लगेच त्यातील दोन मुली ऑर्डर घ्यायला आल्या. इथे जे भारतीय शिक्षण घेतात, ते असे पार्ट टाईम जॉबही करतात, असे ऐकले होते. या मुली बहुतेक अशांपैकीच असाव्यात असे वाटले. आम्ही बरेच थकून आलो होतो व खूप सडकून भूक लागली होती. अशा वेळी, आम्हाला जास्त वाट पाहायला न लावता, रात्री ११.३० वाजता, गरमागरम भारतीय जेवण आमच्यासमोर आले. त्या जेवणाचा स्वाद इतका चांगला लागला म्हणून सांगू!

त्याआधी आम्ही ह्यूस्टन ला ‘नासा’ पाहायला गेलो होतो, तेंव्हा, तेथून निघतांना, मेक्सिकन जेवणाचा आस्वाद घेतला, त्याची माहिती, नंतरच्या एपिसोड मध्ये!

——*****—–

माधव भोपे.

वरील लेखमाला ही, आमच्या अडीच महिन्याच्या अमेरिका वारी नंतर, साधारण नोव्हेंबर डिसेंबर  २०१६ च्या सुमारास लिहिली होती, आणि फॅमिली whatsapp ग्रुप मध्ये टाकली होती. आता त्यात काही इमेजेसची भर घालून, माझ्या ब्लॉग वर प्रकाशित करीत आहे. अर्थात आता बरेच बदल झाले असतील. भारतातही आता आपल्याकडे खूप प्रगती झाली आहे. 

माधव भोपे 

Roads in America-अमेरिकेतील रस्ते

a-Typical-multi-lane-highway-California-USA-b-5-lane-highway-in-the-simulator

Roads in America- अमेरिकेतील रस्ते

अमेरिकेची महत्वाची जमेची बाजू म्हणजे अमेरिकेतील रस्ते. भरपूर रुंद, व्यवस्थित बांधलेले, वेगवान आणि विना थांबता, विना अडथळ्याचा प्रवास करता येण्यासारखे रस्ते.roads in usa-1

३ ते ४ लेन च्या रस्त्यांवर (प्रत्येकी  ३ ते ४, म्हणजे दोन्ही बाजूंनी ६ ते ८ लेन )  तुम्ही विना अडथळा सरासरी ताशी १०० ते १२५ किमी च्या वेगाने आरामात जाऊ शकता. रस्ते दोन प्रकारचे आहेत. एक म्हणजे टोल वेज, म्हणजे ज्या रस्त्यावर प्रवास करण्यासाठी टोल द्यावा लागतो, आणि दुसरे म्हणजे फ्री वेज, म्हणजे ज्यावर टोल द्यावा लागत नाही.

फ्री वेज हे टोल वेज च्या समांतर, पण थोडे बाजूला, कमी रुंद (पण तरीही आपल्याकडील मोठ्या रस्त्यांपेक्षा ही जास्त रुंद) असे रस्ते, जिथे वेगमर्यादा कमी असते. तुम्हाला रमत गमत, आजूबाजूचे निसर्ग सौंदर्य न्याहाळत जायचे असल्यास, तुम्ही अशा फ्री वेज ने जाऊ शकतात.

आणि हो, दोन्ही प्रकारच्या रस्त्यांवर, वेग मर्यादा सगळी वाहने कसोशीने पाळतात. ट्रॅफिक पोलिसाच्या गाड्या उपरोक्त दोन्ही प्रकारच्या रस्त्यांवर कायम गस्त घालत असतात, आणि तुम्ही जर मर्यादेपेक्षा अधिक वेगाने जातांना आढळला, तर लगेच तुम्हाला अडवले जाते.american police stopping a car

अमेरिकेत कायद्याचा चांगलाच दरारा आहे. कोणीही पोलिसांशी हुज्जत घालत नाही किंवा धमकावत नाही. इतकेच नाही तर  पोलिसांनी इशारा केल्यानंतर गुपचुप गाडी बाजूला घेतली जाते व पोलिसांशी अत्यंत आदराने बोलले जाते. कारण येथील ट्रॅफिक पोलिसांनाही खूप अधिकार आहेत, आणि कायदा मोडणार्यांची गय केली जात नाही.

आम्ही इथे असतांना एक बातमी खूप गाजली होती. एका माणसाला ट्रॅफिक पोलिसांनी थांबण्याचा इशारा केला. तो थांबला ही. त्याच्या सोबत त्याची गर्ल फ्रेंड होती. अतिरेक्यांचा भीतीमुळे इथे, सहसा, अशा वेळी पोलीस, त्या व्यक्तीला हात वर करण्याची सूचना देतात. अशा वेळे हात वर करून, पोलिसांच्या आदेशाचे तंतोतंत पालन करणे आवश्यक असते. चुकून जरी हात खिशाकडे गेला, तर, तुम्ही पिस्तुल काढता आहात असे वाटून पोलीस ऑफिसर लगेच त्याच्या जवळचे पिस्तुल काढून तुम्हाला गोळी ही झाडू शकतो. त्याला तसा पूर्ण अधिकार आहे. तर त्या माणसाचा हात खिशाकडे गेल्यामुळे ऑफिसरने गोळी झाडली व त्यात त्या गाडी चालकाचा मृत्यू झाला. तो चालक आफ्रिकन-अमेरिकन (ब्लॅक) असल्यामुळे नंतर बरीच निदर्शने वगैरे झाली. पण त्या ऑफिसर वर काहीही कारवाई झाली नाही, उलट त्याचे वरिष्ठ व सरकार त्याच्या पाठीमागे खंबीर पणे उभे राहिले.

आता टोल रस्ते म्हटल्यावर भारतातील टोल नाके डोळ्यासमोर येतील तर तसे अजिबात नाही. टोल रस्ते असूनही कुठे टोल नाके नाहीत, की गाड्यांचे थांबणे नाही. मग टोल कसा वसूल करतात? इथे जवळ जवळ प्रत्येकाकडे क्रेडिट कार्ड असतेच. अमेरिकेची अर्थव्यवस्था ही क्रेडिट कार्डवरच चालते.

प्रवासासाठी स्वतःची कार हेच मुख्य साधन आहे, तर टोल रोड साठी तुम्हाला प्री पेड कार्ड मिळते. त्याचे एक स्टीकर तुम्ही तुमच्या कारच्या विंडस्क्रीन वर बाहेरच्या बाजूने लावलेले असते. तुम्ही जेंव्हा टोल रोड वरून जाता, तेंव्हा, त्या रोड वर ठराविक अंतरावर, उंच जागी लावलेले कॅमेरे तुमच्या कार वरील त्या स्टीकर वरील इन्फोर्मेशन सेन्स करतात आणि तुमच्या क्रेडिट कार्ड अकौंट मधून टोल ची रक्कम वजा होते. ( आता आपल्याकडेही अशी पद्धत आणण्याचा सरकारचा विचार आहे, असे समजले; खरेच तसे झाले तर खूप बरे होईल. अर्थात, आपल्याकडील डोकेबाज मंडळी टोल कसा चुकवायचा याचे अनेक मार्ग सुरुवातीला शोधून काढतील- उदाहरणार्थ साईडने कट मारणे, स्टीकर झाकून टाकणे, इत्यादि) ज्यांच्या गाडीवर असे स्टीकर नसेल, त्यांच्या गाडीची माहिती कॅमेऱ्यात रजिस्टर होते आणि महिना अखेरीस त्यांना, त्या महिन्यात त्यांनी जेवढा प्रवास टोलच्या रस्त्यावरून केला असेल त्याचे, बिल पोस्टाने त्यांच्या घरी, तसेच ई-मेल वर येते.a-Typical-multi-lane-highway-California-USA-b-5-lane-highway-in-the-simulator

आता आपल्या भारतीय मनाला हा प्रश्न पडू शकतो की बिल न भरले तर काय करून घेणार आहेत? कोण विचारणार आहे? तर याचे उत्तर असे, की अमेरिकेतील ९९ % लोक हे कायदा पाळणारे आहेत. तसे त्यांच्या रक्तातच भिनलेले आहेत म्हटले तरी चालेल. आणि दुसरे म्हणजे, तुम्ही कुठलेही सरकारी बिल थकवले तर तुमच्यावर लगेच कायदेशीर कार्यवाही सुरु होते. त्यात उशीर, किंवा दयामाया नाही, की ओळखपाळख, राजकीय लागेबांधे, इत्यादीचा संबंध नाही. तिसरे म्हणजे तुमचा क्रेडिट कार्डचा स्कोअर खाली येतो आणि परिणाम म्हणून तुमचा व्याजाचा दर वाढतो, त्यावरील लिमिट खाली येते आणि सर्वच बाजूंनी तुमची कोंडी होऊन जाते. त्यामुळे, सरकारी बिल न भरण्याचा वेडेपणा सहसा कुणीही करीत नाही.

या प्रशस्त अशा, सिमेंटने बांधलेल्या टोल वेज वर ठिकठिकाणी स्पष्ट शब्दात माहिती व सूचना लिहिलेल्या असतात (अर्थात त्यांचा अर्थ नीट कळण्यासाठी काही दिवस इथे राहणे आवश्यक आहे). तसेच इलेक्ट्रॉनिक बोर्ड्स वर महत्वाचे संदेश झळकत असतात. एखादे संशयास्पद वाहन, किंवा कायदा मोडून पाळणारे एखादे वाहन असल्यास अशा वाहनांची माहिती या बोर्ड्स वर झळकत असते.

आम्हाला रस्त्यावर अशी माहिती अधून मधून वाचायला मिळत होती. अजून एक म्हणजे, या लांब लचक रस्त्यांवर, समजा एखादे वाहन मध्येच बंद पडले किंवा त्यांना काही कारणामुळे थोडेसे थांबावे लागले, तर रस्त्याच्या कडेला मधून मधून ठराविक अंतरावर जास्तीची जागा असते, जेथे की असे वाहन थोड्या वेळासाठी उभे करता येईल. त्यामुळे बाकीच्या ट्रॅफिकचा खोळंबा होत नाही. अमेरिकेतील असे टोल वेज हे गावांपासून किंवा मुख्य वस्तीपासून भरपूर लांब असतात, त्यामुळे असे रस्ते कुठल्याही गावाच्या भर वस्तीतून जात आहेत असे कधीच नसते. आणि रस्त्यांच्या दोन्ही बाजूंना उंच आणि घनदाट अशी झाडे लावलेली असतात. त्यामुळे, गाडी चालवतांना छान वाटते.

तर अशा या रस्त्यांवर असलेली आणखी एक अप्रतिम सुविधा म्हणजे ठराविक अंतरावर असलेले “रेस्ट एरियाज” . रेस्ट एरिया म्हणजे टोल वे पासून थोड्या अंतरावर, सहसा हिरव्यागार झाडीत आतल्या बाजूस असलेली विश्रांतीची ठिकाणे. ही विश्रांतीची ठिकाणे अत्यंत नीट नेटकी, स्वच्छ आणि विनामूल्य असतात. छोटीशी पण टुमदार, बैठी इमारत, बाहेर गाड्या पार्क करायला खूप म्हणजे खूपच प्रशस्त जागा. आणि बिल्डिंग अर्थातच पूर्णपणे एअर कंडिशन्ड. रेस्ट एरिया मध्ये आत बसायला छान जागा, खुर्च्या, सोफे, इत्यादि असतात.rest area-2

rest_areaत्या त्या भागाचा नकाशा, त्या भागाची माहिती देणारी पॅम्फ्लेट्स इत्यादि ठेवलेले असतात. तेथील छोट्याशा ऑफिसमध्ये माहिती देण्यासाठी एखादी व्यक्ती बसलेली असते व ती तुम्हाला, विचारलेल्या गोष्टीची तत्परतेने व सविस्तर माहिती, हसतमुख चेहऱ्याने देते. प्रत्येक ठिकाणी एक अॅटोमॅटिक व्हेंडिंग मशीन ही ठेवलेली असते, ज्यात तुम्ही ठराविक रकमेची नाणी, नोटा टाकून, किंवा कार्ड स्वाईप करून कोल्ड ड्रिंक, चॉकलेट्स, कुकीज किंवा इतर पॅक्ड खाण्याचे पदार्थ घेऊ शकता. प्रत्येक रेस्ट एरिया मध्ये अत्यंत स्वच्छ, भरपूर पाणी असलेली, कमोड मध्ये पुरेसे टिशू पेपर्स असलेली, पूर्ण एअर कंडिशन्ड, अशी, वॉश रूम उपलब्ध असते (इथे तिला रेस्ट रूम म्हणतात.) लहान मुलांसाठी कमी उंचीची सोय पण उपलब्ध असते. प्रत्येक ठिकाणच्या वॉश बेसिन मध्ये सेन्सर बसवलेले असतात (विमान तळावर असतात तसे), जेणे करून तोटी च्या खाली हात धरल्यावर पाणी येईल.rest area-3

तर तुम्ही गाडी चालवतांना थकले असल्यास, किंवा तुम्हाला सोबत आणलेले पदार्थ खाण्यासाठी थांबायचे असल्यास, ही एक अप्रतिम व्यवस्था आहे. हे रेस्ट एरियाज त्या त्या ठिकाणच्या कौंटी कडून मॅनेज केले जातात असे कळाले.

—–००००—–

माधव भोपे.

वरील लेखमाला ही, आमच्या अडीच महिन्याच्या अमेरिका वारी नंतर, साधारण नोव्हेंबर डिसेंबर  २०१६ च्या सुमारास लिहिली होती, आणि फॅमिली whatsapp ग्रुप मध्ये टाकली होती. आता त्यात काही इमेजेसची भर घालून, माझ्या ब्लॉग वर प्रकाशित करीत आहे. अर्थात आता बरेच बदल झाले असतील. भारतातही आता आपल्याकडे खूप प्रगती झाली आहे. 

माधव भोपे 

Kojagari Poornima- कोजागरी पौर्णिमा

Kojagari Poornima

How to celebrate Kojagari Pornima

Kojagari Poornima- कोजागरी पौर्णिमा

यावर्षी कोजागरी पोर्णिमा केंव्हा आहे- आणि ज्येष्ठ अपत्याला केंव्हा ओवाळायचे

कोजागरी पोर्णिमा
रास पोर्णिमा
कौमुदी महोत्सव
नवान्न पौर्णिमा
कोजागरी पोर्णिमेचे आयुर्वेदात महत्व
आयुर्वेदाप्रमाणे कोजागरी पोर्णिमा कशी साजरी करावी

नवरात्र आणि दसरा झाल्यानंतर आपल्या संस्कृतीत साजरा केला जाणारा एक अतिशय आनंदमय उत्सव म्हणजे कोजागरी पोर्णिमा. यावर्षी पंचांगात पोर्णिमा दोन दिवस दाखविली आहे, त्यामुळे काही लोकांचा संभ्रम होण्याची शक्यता आहे. पण याचे निराकरण दातेंच्या आणि अन्य पंचांगातच दिलेले आहे. यावर्षी पोर्णिमा तिथी दि. १६ ऑक्टोबर बुधवारी संध्याकाळी ८ वाजून ४० मिनिटांनी लागते आहे, आणि दि. १७ ऑक्टोबर गुरुवारी संध्याकाळी ४ वाजून ५५ मिनिटांनी संपते आहे. कोजागरीचा उत्सव हा रात्री साजरा करीत असल्यामुळे, आज म्हणजे दि. १६ ऑक्टोबर बुधवारीच रात्री हा उत्सव साजरा करण्याचा आहे. पण कोजागरी पोर्णिमेला ज्येष्ठ अपत्याला ओवाळण्याचा कार्यक्रम (ज्येष्ठापत्य निरंजन) मात्र दुसऱ्या दिवशी, म्हणजे दि. १७ ऑक्टोबर गुरुवारी करायचा आहे.
आपण यापूर्वीच्या “नवदुर्गांची उपासना ” या लेखात बघितल्याप्रमाणे, हिंदू धर्मातील बहुतेक सर्व सण आणि व्रतें ही निसर्गचक्राशी जोडली गेलेली आहेत असे दिसते. तसेच कोजागरी पोर्णिमेला धार्मिक आणि पौराणिक संदर्भही जोडले गेले आहेत. आज इथे आपण त्या सर्वांची माहिती करून घेणार आहोत.


पौराणिक संदर्भ


पुराणात असा उल्लेख आहे. की ह्या दिवशी आकाशात देवी लक्ष्मी, देवांचा खजिनदार कुबेर आणि देवराज इंद्र फेरफटका मारण्यास निघतात. आणि कोण जागा आहे हे पाहण्यासाठी “कोजागर्ति कोजागर्ति” असा आवाज देतात. जे जागे असतात त्यांच्यावर लक्ष्मी आणि कुबेराची कृपा होते. त्यांच्या पाठोपाठ लक्ष्मीची खाष्ट बहीण फेरा मारते. तिला आक्काबाई म्हणतात. जे जागे नसतात,  निद्रिस्त असतात त्याना ती शाप देते. त्याना दारिद्र्य येते. म्हणुनच एखादा मनुष्य चोहोकडून संकटात आला की त्याच्यावर आकाबाईचा फेरा आला असे म्हटले जाते.
या पौर्णिमेच्या दिवशी रात्री, साक्षात लक्ष्मीदेवी चंद्रमंडळातून येऊन पृथ्वीवर उतरते. आणि मध्यरात्री ‘को जागर्ति’ (म्हणजे ‘कोण जागत आहे’) असे म्हणत मनुष्याचे प्रयत्न पहात पृथ्वीतलावर संचार करीत असते अशी धारणा आहे. त्यामुळेच या पौर्णिमेला कोजागरी पोर्णिमा असे म्हणतात- कोजागिरी हा त्याचा अपभ्रंश आहे. ‘कोण जागे आहे’ याचा मथितार्थ आहे कोण सजग आहे आणि ज्ञानासाठी आतुर आहे असे देवी विचारत येते.
पौराणिक कथांनुसार शरद पौर्णिमेच्या दिवशी माता लक्ष्मीचा जन्मदिवस मानला जातो, ज्या दिवशी ती समुद्र मंथनातून प्रकट झाली होती.

ऐतिहासिक संदर्भ-

शिवाजी महाराज

इतिहासकार सभासदांच्या बखरीत असा उल्लेख आढ़ळतो की अफजलखान वध करून जेव्हा शिवाजी महाराज परत आले त्यावेळी महाराणी सईबाईसाहेब निवऱ् तल्या   होत्या. त्या आठवणीने राजे बेचैन होऊन  रात्री आपल्या वाड्याच्या सौंधावर येरझाऱ्या घालित होते. इतक्यात त्याना “कोजागर्ति”असा आवाज ऐकू आला. त्याचक्षणी अष्टावधानी राजांनी उत्तर दिले “अहम जाग्रति “! असे म्हणतात की त्याचवेळी आई भवानीने राजाना दर्शन देवून आशिर्वाद दिला.

रास पोर्णिमा (Raas Poornima/ Ras Pornima)

कोजागरी पौर्णिमेच्या रात्री चंद्र आपल्या संपूर्ण १६ कलांमध्ये असतो. चंद्राची किरणे विशेष अमृतमयी गुणांनी युक्त असतात. श्रीकृष्ण १६ कलांचे अवतार मानले जातात. द्वापार युगात वृंदावनमध्ये भगवान श्रीकृष्णाने गोपिकांसोबत रात्री रासक्रीडा (महारासलीला) केली होती. त्यामुळे या पोर्णिमेला ‘रास पोर्णिमा’ असेही म्हणतात. वृंदावनात निधिवनात आजही श्रीकृष्ण आणि गोपिका रासलीला रचतात अशी मान्यता आहे. त्या विशेष प्रसंगाची आठवण करून वैष्णव संप्रदायाचे भक्त रासोत्सव साजरा करतात.श्रीकृष्ण आणि राधाची विशेष उपासना केली जाते.

कौमुदी महोत्सव (Kaumudi Mahotsav)

कौमुदी महोत्सव हा प्राचीन भारतात साजरा केला जाणारा सण होता. कौमुदीच्या दिवशी (म्हणजे कार्तिक महिन्याची पौर्णिमा) हा सण साजरा केला जात असे.
विवाहित जोडप्यांमध्ये प्रेम आणि आनंद वाढावा यासाठी कौमुदी महोत्सवाचे आयोजन करण्यात येत असे. कौमुदी महोत्सव हा भारतात फार प्राचीन काळापासून चालत आलेला सण आहे. या सणाच्या काळात झाडांमध्ये अनेक प्रकारची रंगीबेरंगी फुलेही बहरतात. शेतात पिकांचे वेगवेगळे रंग दिसतात. हळुवार पणे वाहणारा थंड गार वारा आणि बहरलेले चांदणे प्रत्येकाचे मन वेधून घेतात.

धार्मिक महत्त्व

या दिवशी करायच्या व्रतात रात्री लक्ष्मीची, कुबेराची  आणि ऐरावतावर बसलेल्या इंद्राचीही  पूजा केली जाते. उपोषण, पूजन व जागरण या तीनही अंगांचे  या व्रतात सारखेच महत्त्व आहे. या व्रतात रात्रीच्या पहिल्या प्रहरी लक्ष्मी व इंद्र, बळीराजा यांच्या प्रतिमांची पूजा करतात व मग त्या दोघांना पुष्पांजली समर्पित करतात. चंद्राला आटीव दुधाचा नैवेद्य दाखवतात. दुसऱ्या दिवशी प्रातःकाळी बळीराजा-लक्ष्मीची पूजा करून व सर्वांना भोजन घालून पारणे करतात.

नवान्न पौर्णिमा (Navanna Poornima)

कृषि संस्कृतीमध्ये या दिवसाचे विशेष महत्त्व आहे.
निसर्गाबद्दल वाटणाऱ्या कृतज्ञतेपोटी कोकणात नवान्न पौर्णिमा साजरी करण्याची प्रथा आहे. या दिवशी बाजारात भाताच्या लोंब्या, कुरडूची फुले, नाचणी, वरी आणि झेंडूची फुले खरेदी करण्यासाठी मोठी गर्दी होते.
या दिवशी घरांघरांत नवीन धान्य आलेले असते. भात, नाचणी, वरी आदी प्रकारच्या धान्याची एकप्रकारे पूजा करण्याचा दिवस म्हणजे नवान्न पौर्णिमा या दिवशी नवीन तांदळाचा भात, खीर करण्याची प्रथा आहे. पक्वान्न म्हणून नवीन तांदळाच्या पिठाचे पातोळेही केले जातात. नवान्न पौर्णिमेला लक्ष्मीच्या स्वागतासाठी घरासमोर रांगोळ्या काढतात.

आयुर्वेदाच्या दृष्टीने कोजागरी पोर्णिमा

(Ayurvedic importance of Kojagari Purnima)

आयुर्वेदाच्या दृष्टीने कोजागरी पोर्णिमा म्हणजे ऋतूचक्रातील बदलाचा शरीरावर होणारा विपरीत परिणाम टाळण्यासाठी म्हणून केलेली उपाययोजना असे म्हणता येईल.
आश्विन महिना हा म्हणजे ऋतू चक्रानुसार शरद ऋतू आणि हेमंत ऋतू यामधील संधिकाल! या महिन्यात पाऊस कमी होत होत थांबतो आणि मग दिवसा कडक ऊन पडायला सुरुवात होते.याला आपण ऑक्टोबर हीट म्हणतो. पावसाळ्यातील कुंद, दमट हवामान, गारवा,नवीन पाणी आणि त्या काळात घेतला जाणारा आहार यामुळे शरीरात पित्त दोष वाढलेला आणि साठलेला असतो. हाच साठलेला पित्त दोष शरदात कडक ऊन पडू लागले की अजून वाढतो, आणि पित्ताचे विविध विकार निर्माण करतो. हा त्रास होऊ नये म्हणून पित्त शामक पदार्थ आहारात वाढवायला हवे. गोड, मधुर चवीचे व शीतल ,थंड पदार्थ पित्त कमी करतात व त्याला नियंत्रणात ठेवायला मदत करतात. फक्त थंड पदार्थ जे वापरायचे ते नैसर्गिकरित्या थंड हवेत,कृत्रिम पद्धतीने गार केलेली शीतपेये ,आईस्क्रीम वगैरे नकोत! आयुर्वेदानुसार दूध हे उत्तम पित्त शामक आहे. पित्ताच्या चिकित्से मध्ये विरेचन ही येते. आणि दूध हे विरेचनाचे सुद्धा काम करते.
आयुर्वेदानुसार, या दिवशी सकाळी दूध आटवून ठेवावं व संध्याकाळी चंद्रोदय झाल्यावर मोकळ्या अंगणात, गच्चीवर किंवा गॅलरीत दूध थंड व्हायला ठेवावं. दुधाच्या भांड्यावर पातळ कॉटन किंवा मलमलचं कापड झाकून ठेवावं म्हणजे धूळ वगैरे पडत नाही. हे दूध तयार करताना खरं म्हणजे नुसती खडीसाखर आणि वेलचीपूड घालणं अपेक्षित आहे- आणि फार झाले तर अजून त्यात थोडेसे जायफळ आणि केशर घातले तर अजून चांगली चव येऊ शकते. हल्ली मात्र दूध अगदी घट्ट रबडी प्रमाणे आटवून ,मलईदार बनवून शिवाय त्यात भरपूर सुका मेवा टाकला जातो. आटीव दूध आधीच पचायला जड होतं त्यात सुका मेवा घातल्याने ते अजूनच जड होतं. त्यात सोबत भेळ, चिवडा, समोसे, कचोरी, काय वाट्टेल ते- चवीच्या नावाखाली, खाल्ले जाते. अशावेळी या सर्व गोष्टींबरोबर दूध हे पचनावर फारच ताण देणारं ठरतं. त्यामुळे खालील काळजी घेतली, तर दुधाचा खरा फायदा होईल.
•दूध खूप घट्ट आटवू नये तसेच खूप बदाम काजू, चारोळी वगैरे खूप जास्त टाकू नये. अगदी चवीपुरते खूप थोड्या प्रमाणात घालायला हरकत नाही.
•ज्यांचा कोठा मुळातच हलका आहे अशा व्यक्तींनी दूध बेतानेच प्यावे.

अशा प्रकारे कोजागरी पोर्णिमा साजरी केली तर तिचा खरा आनंद घेता येईल.
आपणा सर्वांना कोजागरी पोर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!

माधव भोपे 

Teachers day 2024 शिक्षक दिवस

Memories of Teachers Day 

Teachers day 2024 शिक्षक दिन 

शिक्षक दिवस की पुरानी यादें 

कौन हैं इस वर्ष  के पुरस्कार विजेता शिक्षक ?

पूरे वर्ष में कई दिन मनाए जाते है। लेकिन स्वतंत्रता दिवस और गणतंत्र दिवस को छोड़कर केवल 5 सितंबर को  शिक्षक दिन ही मुझे पक्का याद रहता है। उसका कारण है शिक्षक  दिवस से जुड़ी हमारी स्कूली जिंदगी की यादें और साथ ही हमारे संस्कारी उम्र में हमें पढ़ाने वाले हमारे गुरुजनों  की यादें।

जिस तरह भारत में शिक्षकों के प्रति कृतज्ञता  व्यक्त करने के लिए शिक्षक दिवस मनाया जाता है, उसी तरह यह पूरी दुनिया में मनाया जाता है, लेकिन 5 सितंबर को नहीं। यूनेस्को 5 अक्टूबर को विश्व शिक्षक दिवस के रूप में मनाता है।

दुनिया के 100 से ज्यादा देशों में अलग-अलग दिनों को शिक्षक दिवस मनाया जाता है। विश्व शिक्षक दिवस 5 अक्टूबर को मनाया जाता है।

 1994 में यूनेस्को ने शिक्षकों के काम को मनाने के लिए 5 अक्टूबर को ‘विश्व शिक्षक दिवस’ के रूप में मनाने की मंजूरी दी।

1962 से, हम भारतमें  प्रसिद्ध शिक्षाविद् और भारत के दूसरे राष्ट्रपति सर्वपल्ली राधाकृष्णन के जन्मदिन पर  शिक्षक दिवस मना रहा है।

सर्वपल्ली राधाकृष्णन का जन्म 5 सितंबर, 1888 को ब्रिटिश काल के मद्रास प्रेसीडेंसी के उत्तरी आरकोट जिले के एक गाँव तिरुतनी में एक तेलुगु ब्राह्मण परिवार (अब तमिलनाडु में तिरुवल्लूर जिला) में हुआ था। अपनी विद्वता के माध्यम से उन्होंने शिक्षा के क्षेत्र में अपनी पहचान बनाई। कुछ पश्चिमी दार्शनिकों द्वारा वेदांत दर्शन को गलत परिप्रेक्ष मे दिखाए जाने पर  व्यथित  होकर, उन्होंने वेदांत दर्शन और अद्वैत दर्शन का गहन अध्ययन करके, पश्चिमी दार्शनिकों को उत्तर देने के लिए 1914 में “द एथिक्स ऑफ वेदांत ” नामक एक थीसिस प्रकाशित की, जिसमे वेदान्त दर्शन के मूल सिद्धांत को सही तरीके से पेश किया गया। वह सनातन हिंदू दर्शन और अद्वैत वेदांत के कट्टर समर्थक थे।

राधाकृष्णन को 1952 में भारत का उपराष्ट्रपति चुना गया और 1962 में वे भारत के दूसरे राष्ट्रपति बने। वह 1967 तक भारत के राष्ट्रपति रहे । राधाकृष्णन को 1954 में भारत रत्न से सम्मानित किया गया था।

जब वे भारत के राष्ट्रपति बने तो जब उनके कुछ छात्र 5 सितंबर को उनका जन्मदिन मनाने उनसे मिलने गए तो उन्होंने सुझाव दिया कि उनका जन्मदिन मनाने की बजाय 5 सितंबर को देश के शिक्षकों के सम्मान में शिक्षक दिवस के रूप में मनाया जाना चाहिए। तब से, 5 सितंबर को भारत में शिक्षक दिवस के रूप में मनाया जाता है।

हमारे स्कूली दिनों मे शिक्षक दिवस की यादेंteachers day

शिक्षक दिवस पर, हम उस समय के अपने शिक्षकों को याद किए बिना नहीं रह सकते। शिक्षक दिन मुझे अपने  शिक्षकों  के जुनून की याद दिलाता है। उस समय शिक्षकों और बच्चों के बीच बहुत गहरे  संबंध हुवा करते थे।teachers day छात्रों को शिक्षकों के प्रति बहुत सम्मान था, और शिक्षकों का भी छात्रों के प्रति अपार स्नेह हुवा करता था। शिक्षक दिवस को विशेष रूप से याद किए जाने का एक कारण यह भी है की उस दिन छात्र शिक्षक की भूमिका निभाते थे।  शिक्षक दिवस पर स्कूल के होनहार छात्र अलग-अलग विषयों के ‘शिक्षक’ बना करते थे । और शिक्षकों की तरह क्लास मे पढ़ाते थे।  उनके सहपाठी बड़े उत्साह के साथ उनकी कक्षा में उपस्थित होते थे । कुछ नटखट छात्र  अपने  इन ‘शिक्षकों  के, कुछ कठिन सवाल पूछ कर मजे भी लिया किया करते थे । शिक्षक भी अपने विद्यार्थियों को क्लास मे पढ़ाते हुवे देखने के लिए कक्षा में आते थे । हेडमास्टर भी कोई छात्र ही बना करता था। एक  कार्यक्रम मे शिक्षकों के सम्मान मे भाषण भी होते थे और उनके कार्य की सराहना करके उनको धन्यवाद दिया जाता था।  

शायद यह प्रथा अभी भी शुरू है।  पाठकों से अपील है की, वह इस बारे मे अपने अपने अनुभव, नीचे कमेंट्स में लिखे। 

भारत मे. सन 1958 से शिक्षकों को उनके कार्य के लिए पुरस्कार से सम्मानित किए जाने की प्रथा चल रही है। 1962 मे जबसे 5 सितंबर को शिक्षक दिन मनाया जाने लगा, तबसे यह पुरस्कार हर साल 5 सितंबर को दिया जाने लगा.

राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार 2024 प्राप्त करने वाले शिक्षकों की सूची

भारत की राष्ट्रपति द्रौपदी मुर्मू द्वारा निम्नलिखित 50 शिक्षकों को 5 सितंबर को उत्कृष्ट शिक्षक के रूप में सम्मानित किया जाएगा। और उन्हें नकद रु 50000/ एक प्रमाण पत्र और एक रजत पदक प्रदान किया जाएगा।

  1. अविनाशा शर्मा – हरियाणा
  2. सुनील कुमार – हिमाचल प्रदेश
  3. पंकज कुमार गोया – पंजाब
  4. राजिंदर सिंह – पंजाब
  5. बलजिंदर बराड़ सिंह – राजस्थान
  6. हुकम चौधरी चंद – राजस्थान
  7. कुसुम लता गरिया – उत्तराखंड
  8. चंद्रलेखा दामोदर मेस्त्री – गोवा
  9. चंद्रेशकुमार भोलाशंकर बोरीसागर – गुजरात
  10. विनय शशिकांत पटेल – गुजरात
  11. माधव पटेल प्रसाद – मध्य प्रदेश
  12. सुनीता गोधा – मध्य प्रदेश
  13. के, शारदा – छत्तीसगढ़
  14. नरसिम्हा मूर्ति एचके – कर्नाटक
  15. द्विति चंद्र साहू – ओडिशा
  16. संतोष कुमार कर – ओडिश
  17. आशीष कुमार रॉय – पश्चिम बंगाल
  18. प्रशांत कुमार मारिक – पश्चिम बंगाल
  19. उर्फनामीन जम्मू – कश्मीर
  20. रविकांत द्विवेदी – उत्तर प्रदेश
  21. श्याम मौर्य प्रकाश यू – उत्तर प्रदेश
  22. डॉ. मिनाक्षी कुमारी – बिहार
  23. सुकेंद्र कुमार सुमन – बिहार
  24. के. सुमा – अंडमान एंड निकोबर द्वीप
  25. सुनीता गुप्ता – मध्य प्रदेश
  26. चारू शर्मा – दिल्ली
  27. अशोक सेनगुप्ता – कर्नाटक
  28. एच एन गिरीश – कर्नाटक
  29. नारायणस्वामी.आर – कर्नाटक
  30. ज्योति पंका – अरुणाचल प्रदेश
  31. लेफिजो अपोन – नागालैंड
  32. नंदिता च ओंगथम – मणिपुर
  33. यांकिला लामा – सिक्किम
  34. जोसेफ वनलालह्रुआ सेल – मिजोरम
  35. एवरलास्टी एनजी पाइनग्रोप – मेघालय
  36. डॉ.नानी जी देबनाथ – त्रिपुरा
  37. दीपेन खानिकर – असम
  38. डॉ. आशा रानी – झारखंड
  39. जिनु जॉर्ज – केरल
  40. के सिवाप रसद – केरल
  41. मिडी श्रीनिवास राव – आंध्र प्रदेश
  42. सुरेश कुनाट – आंध्र प्रदेश
  43. प्रभाकर रेड्डी पेसरा – तेलंगाना
  44. थदुरी संपत कुमार – तेलंगाना
  45. पल्लवी शर्मा – दिल्ली
  46. चारु मैनी – हरियाणा
  47. गोपीनाथ आर – तमिलनाडु
  48. मुरलीधरन रमिया सेथुरमन – तमिलनाडु
  49. मंटय्या  चिन्नी बेडके – महाराष्ट्र Z.P.UPEER PRIMZRY DIGITAL SCHOOL JAJAVANDI
  50. सागर चित्तरंज एन बागडेमहाराष्ट्र SOU S. M. LOHIA HIGHSCHOOL AND JUNIOR COLLEGE KOLHAPUR

 

संबंधित शिक्षकों के स्कूल का नाम, पता सहित पूरी सूची और पूरी सूची के लिए यहां क्लिक करें।